व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -परप्रांतीयांना महाराष्ट्रातून बाहेर काढण्याची मनसेची भूमिका असल्यामुळे मनसे विरुद्ध परप्रांतीय असं चित्र पाहायला मिळालं आहे.
एकीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु आहे तर दुसरीकडे राज ठाकरेंना अयोध्येत येण्यास विरोध होत आहे. राज ठाकरेंनी पूर्वी परप्रांतीयांबद्दल खासकरून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. याबाबत राज ठाकरेंनी जाहिर माफी मागावी आणि मग अयोध्योत यावे. अन्यथा त्यांना अयोध्येत पाय ठेवून देणार नाही अशी अट भाजपचे खासदार ब्रीजभूषण सिंह यांनी घातली आहे. त्यांच्या या आव्हानाला यशवंत किल्लेदार यांनी उत्तर देतानाच परप्रांतीयांचं कौतुक केलं आहे. त्यामुळे परप्रांतीयांबात मनसे मवाळ होतेय का असा प्रश्न उपस्थित होतोय.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतल्यामुळे मनसेनं भूमिका कशी बदलली अशी चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे, मुंबईचा विकास हा भुमिपुत्रांमुळे झालाय आणि मेट्रो सिटी असल्यामुळे परप्रांतींयाचे सुद्धा यामध्ये योगदान आहे’ असा दावाच मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केला आहे. मात्र मनसेच्या स्थापनेपासूनचा इतिहास पाहता मनसेने परप्रांतीयांबाबत कठोर भूमिका घेत अनेकदा तीव्र आंदोलनं केली आहेत. परप्रांतीयांना महाराष्ट्रातून बाहेर काढण्याची मनसेची भूमिका असल्यामुळे मनसे विरुद्ध परप्रांतीय असं चित्र पाहायला मिळालं आहे. राज ठाकरेंनी खासकरून उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या लोकांना मनसेने सर्वात जास्त विरोध केला आहे. मात्र आता हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे मनसे परप्रांतीयांच्या बाबतीत मवाळ झाली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.
राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि मगच उत्तर प्रदेशला यावे अशी अट भाजपचे खासदार ब्रीजभूषण सिंह यांनी घातली आहे.
Discussion about this post