व्हीएसआरएस मराठी न्युज -निगडी येथे पुणे-मुंबई महामार्गावर वाहतुकीचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी नागरिकांना रस्ता ओलांडता यावा. तसेच व्यापारी व वाहतुकीच्या दृष्टिकोनातून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पादचारी भुयारी मार्ग, अशी मागणी निगडीतील व्यापाऱ्यांनी केली होती.
निगडीत भुयारी मार्गच व्हायला व्हावा. नागरिकांना रस्ता ओलांडून जाणे अवघड होणार आहे. निगडीतील मॉडर्न, माता अमृतानंदमयी शाळा, एसपीएम शाळा, विद्यानंद भवन, सेंट उर्सुला, कीर्ती विद्यालय, ज्ञानप्रबोधिनीसह महापालिकेच्या शाळांना रस्ता निगडी गावठाणामधून जात आहे. त्यामुळे या शालेय मुलांचे मोठे नुकसान होत आहे.
– रोहिदास शिवणेकर, व्यापारी संघटना अध्यक्ष, निगडी
यांनी मांगणी केली होती आणी प्रत्यक्ष काम जोरात चालु झाले आहे.
उड्डाणपूल ओलांडून जाणे अवघड आहे. रस्त्याला दुकाने असून सध्या ती बंद असल्यासारखी आहेत. तसेच, शालेय मुलांसाठी हा रस्ता सोईस्कर आहे. सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अपघात दैनंदिन होत आहेत. वाहने भरधाव वेगाने येत असतात. यापूर्वी दोन वेळा आंदोलने केली आहेत. त्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली ,आणी काम चालू करण्यात आले.
भुयारी मार्ग बांधल्यास विभागलेले गाव जोडले जाणार आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन ते चार शाळा आहेत. जवळच दवाखाना आहे. त्यामुळे, केवळ पादचारी मार्ग बांधून शाळेतील मुलांची व नागरिकांची तसेच इतर कामांसाठी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार आहे. भुयारी पादचारी मार्गाने ही गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. त्यातून दुचाकी वाहने जाण्यासही मदत होइल. साडेतीन कोटी रुपये खर्च करून पादचारी मार्गाचे काम दिले आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता या कामाची निविदा काढण्यात येत आहे. त्यामुळे, ही निविदा रद्द करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
Discussion about this post