व्हीएसआरएस मराठी न्युज -लांबलेला पावसाळा यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.
शुक्वारी (ता. २४) तो केवळ १९ टक्के होता. गेल्या वर्षी जूनच्या तुलनेत आजचा साठा १८ दशलक्ष घनफुटाने (टीएमसी) कमी अर्थात ७.६१ टक्क्यांनी कमी आहे. मात्र, तो ३० जुलैपर्यंत पुरेल इतका असल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही, अशी सद्यःस्थिती आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत पवना धरण आहे. पवना धरणातून वीज निर्मिती केंद्रातून दररोज विसर्ग करून पाणी नदीत सोडले जाते. रावेत बंधारा येथून २० पंपांच्या साह्याने अशुद्ध जलउपसा केला जातो. तेथून पाणी जलवाहिनीद्वारे निगडी-प्राधिकरण सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. त्यानंतर शहरात नळांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, कमी दाबाने, अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या.
गेल्या अडीच-तीन वर्षांपासून दिवसाआड पाणी येत आहे. आमच्या गल्लीचा भाग खाली असल्यामुळे आम्हाला पुरेसे पाणी मिळते. पण, शेजारची गल्ली थोडी उंचावर असल्याने त्यांना थोडं कमी पाणी मिळतं. मात्र ते लोक दोन दिवस पुरेल इतकं पाणी भरून ठेवतात. त्यामुळे फारशी अडचण येत नाही.
Discussion about this post