व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी-
ताई… फळांच्या बिया दे अन् कर पर्यावरणाचे रक्षण…
श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनच्या दिवशी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनाचे औचित्य साधून श्री. कैलास गणपत कुटे यांच्या संकल्पनेतून ‘बियांची बँक’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम साकारण्यात येत आहे.
या उपक्रमात परिसरातील प्रत्येक महिलेने विविध फळांच्या बियांचा वापर करून प्रतिकात्मक बियांची राखी आपल्या भावाला देणार आहे. त्यामुळे बियांचे रोपण करून वृक्ष लागवडीच्या मोहिमेला हातभार लागणार आहे. या उपक्रमातून आपण विविध प्रजातीच्या बियांचा (उदा. रामफख, सिताफळ, खारीक, चिकू, जांभूळ इ.) अशा अनेक प्रकारच्या फळांच्या बियांचा वापर करून राखी तयार करणे तसेच प्लास्टिक, धर्माकोल, स्पंच या वस्तूंचा वापर न करता पर्यावरणपूरक इको-फ्रेंडली रक्षाबंधन करण्यात येईल.
‘चला तर मग बेटी बचाओ, वृक्षलागवड आणि इको फ्रेंडली रक्षाबंधन या उपक्रमात सामील होऊन पर्यावरणाचे रक्षण करू या…” आपली इको-फ्रेंडली राखी जनसंपर्क कार्यालयात नाव पत्त्याच्या कात्रणासह जोडावी व २२ ऑगस्टपर्यंत जमा करावी वृक्षसंवर्धनासाठी दिलेल्या राखीला भावाकडून आकर्षक भेटवस्तू दिली जाईल.
Discussion about this post