व्हीएसआरएस न्युज पिंपरी-
चिखली परीसरचे कै .राजेंद्र जिजाबा तांबे यांचे दिनांक ३/६/२१ राेजी कोरोनामुळे दु खद निधन झाले. ते चिखली परिसरातील गुंजकर दवाखान्यात अॅडमिट होते. त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अवाजवी खर्च दाखवून बिल मोठ्या प्रमाणात आमच्याकडून आकारण्यात आले. तीन वेगवेगळी बिले वेगवेगळ्या वेळेस देण्यात आली .
यावर आम्ही आपल्या वैद्यकीय विभागाला तक्रार करून त्या बिलाचे ऑडिट करून आपल्या विभागाकडून दिनांक ११/६/२१रोजी नोटीस काढून दिनांक १३ रोजी गुंजकर दवाखान्याला देण्यात आली . त्यामध्ये आमच्या नातेवाईकांना रु रक्कम १५९९०० /- (एक लाख एकोणसाठ हजार नऊशे )रुपये परत करण्यास सांगितले परंतु आजतागायत दवाखान्यांकडून कोणताही उत्तर आलेले नाही. नातेवाईक दवाखान्यात गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळतात. या अशा प्रकारच्या अनेक केसेस या दवाखान्यात घडलेल्या आहे . अनेक नागरिकांनी आमच्याकडे त्याची तक्रारही केली आहे . तरी आपण या दवाखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा .
मागणी नगरसेविका मिनल यादव यांनी पिंपरी-चिंचवड आयुक्त यांच्या कडे केली आहे.
Discussion about this post