व्हीएसआरएस न्युज मुंबई -राज्यात आज 3, 626 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 हजार 988 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 755 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 09 टक्के आहे.
राज्यात आज 37 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 47 हजार 695 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,413 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (71), नंदूरबार (2), धुळे (3), जालना (45), परभणी (59), हिंगोली (18), नांदेड (23), अमरावती (90), अकोला (16), वाशिम (11), बुलढाणा (90), यवतमाळ (12), नागपूर (53), वर्धा (2), भंडारा (1), गोंदिया (5), गडचिरोली (34) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 49,99,475 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,89,800 (11.8 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,03,199 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,963 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Discussion about this post