व्हीएसआरएस न्युज भोसरी दि. १९,
पिपंरी चिचंवड शहर जिल्हा काँग्रेस कडून आदर्शनगर भोसरी येथे रविवारी नुकतेच पी एम टी चौक ते सॅण्डविक कॅालनी परिसराजवळील आदर्शनगर पर्यंत पदयात्रा घेत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व उल्लेखनीय कार्य करणा-या नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
बहुजन समाज पक्षाचे पुणे जिल्हा सचिव हरिष डोळस यांचा नुकताच सहका-यांसमवेत काँग्रेस पक्षात काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश घेण्यात आला. डोळस यांनी प्रवेशानतंर आदर्शनगर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले. सुरवातीस पीएम टी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून पदयात्रेस सुरूवात करण्यात आली नतंर बुध्द विहारात अभिवादन करून पदयात्रा आदर्शनगर पर्यंत घोषणा देत पुढे आणण्यात आली व आदर्श नगर येशील मैदानात मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्या दरम्यान वंचित बहूजन आघाडीच्या रेखा ओव्हाळ, मनोरमा रोकडे, कोमल पाईकराव, सीमा आगम, बहूजन समाज पक्षाच्या अनिता डोळस,सविता डोळस, भीमाई बचत शीतल साळवे,सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीबाई डोळस,संगीता जाधव, आशा जाधव व अनिता अडसुळे यांनी
यांनी काँग्रेस पक्षात अखिल भारतीय काँग्रेस चे सचिव पृथ्वीराज साठे व कैलास कदम यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला. त्यांचे काँग्रेस चे उपरणे देऊन पक्षात स्वागत करण्यात आले.
या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या रघुनाथ डोळस, भीमराव गायकवाड, सुरेश डोळस, राघू कदम, डॉक्टर आलम, पुष्पेन्द्र नाईक, शंकर गंगावणे, मुनव्वर शहा रौफ शेख, मौलाना रहमत अली, मौलाना अब्दुल लतीफ, अरुण वाघमारे, जगन्नाथ जाधव, रफ्तार भाई शहा, अनिल जाधव, अनिल रोकडे, बालाजी पाईकराव, गौतम आगम,दिनेश पडघम, आरिफ खान, पेत्रस पारखे, प्रकाश पोपळे या नागरिकांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना काँग्रेस चे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे म्हणाले, “आज देशापुढील आव्हाने पाहता काँग्रेस पक्षाने देशाला नेतृत्व देण्याची नितांत गरज आहे अशी भावना जनमाणसात आहे भाजपाने देश विकायला काढला आहे, काँग्रेस पक्षाने देशात जे जे घडवलं वाढवलं ते भाजपाने विकायला काढून देशात अर्थिक संकट निर्माण केले आहे व ही भाजपाची भ्रष्ट सत्ता उलथवून टाकणे हिच आपली प्राथमिकता आहे. शहरातील राजकीय परिस्थिती पाहता सध्या काँग्रेस चे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या निवडीनतंर अल्पावधीतच शहरात काँग्रेस पक्षाचे अतिशय चांगले, प्रभावी व उत्तम काम सुरू केले आहे व एक नवचैतन्य व उर्जा निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपाने सध्या जनतेची लूट सुरू केली आहे व केंद्रातील भाजपा कडून देशातील विविध संस्था विक्रीस काढल्या जात आहेत व येथे मनपा तून जनतेची लूट सुरू आहे या दुहेरी संकटातून जाताना नागरिकांवर आलेली दुर्दैवी वेळ अनुभवताना जनता आक्रोश करत आहे व या प्रसंगात काँग्रेस पक्ष जनते बरोबर खंबीर पणे उभा आहे.
काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्व बंधू भगिनींचा योग्य मानसन्मान राखला जाईल” असे ते म्हणाले.
काँग्रेस चे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले, “काँग्रेस पक्षाने भोसरी गावातूनच पहिला आमदार दिला व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पहिले महापौरपद हि दिले व काँग्रेस पक्षानेच भोसरी चा राजकीय सन्मान वाढवला तद् नतंर अनेकांनी पक्ष सोडला व सध्यातर भोसरी व संपूर्ण शहराची मान खाली होईल असे वर्तन भाजपाच्या पदाधिका-यांनी केले. काँग्रेस पक्षाने भोसरी चा राजकीय सन्मान वाढवला, भाजपाने तो घालविला. भाजपाची शहरातील राजवट ही केवळ लूट करणारी आहे महागाई ने जनता होरपळत आहे मात्र सत्ताधारी भाजपा सत्तेची फळे लाटण्यात मस्त व जबाबदा-यांपासून सुस्त आहे येणा-या सर्वच निवडणूकांतून या भाजपा ला त्यांची जागा दाखवून देण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याचे काम आम्ही करत आहोत भोसरीतील हा मेळावा परिवर्तनाची नांदी ठरणारा आहे शहरात परिवर्तन होणार हे सरळ स्पष्ट आहे. काँग्रेस पक्षा कडे वाढणारा नागरिकांचा कल व होणारे विविध पक्ष संघटनांतून प्रवेश हे त्याचे प्रतिक आहे पक्षात आलेल्या सर्वांचा योग्य मान सन्मान जपत त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा कर्तव्य बजावण्यात आम्ही कमी पडणार नाही.” असे कदम म्हणाले.
या प्रसंगी काँग्रेस चे शहराध्यक्ष कैलास कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश काँग्रेस चे पर्यावरण विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एन एस यु आय चे शहराध्यक्ष डॅा.वसीम इमानदार, ॲड के एम रॅाय, ओबीसी विभागाचे अध्यक्ष अल्ताफ शेख, महिला नेत्या नंदाताई तुळसे, छायावती देसले, शाम भोसले, अबुबक्र लांडगे, विश्वनाथ जगताप, हिराचंद जाधव, सौरभ शिंदे, आयोजक हरीश डोळस, मोहसिन शेख, गोरक्षनाथ वाघमारे,स्वप्निल बनसोडे आदि पदाधिकारी व बहूसंख्य नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post