व्हीएसआरएस न्युज दिल्ली-
उत्तर प्रदेशच्या बुंदेलखंड प्रांतातील बांदा जिल्ह्यात एक रणरागिनी गेल्या दोन तपासून महिलांवरील अत्याचार व शोषणाच्या विरोधात साक्षात चण्डिकेच्या अवतारात कार्यरत आहे,या सामाजिक-राजकीय नेतृत्वाचे नाव आहे,श्रीमती संपत पाल.
दीर्घकाळापासून काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असल्याने मला अशा अनेक थोर-मोठ्यांना व संत प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना भेटण्याची संधी मिळते व हृदय संवाद साधता येतो हे माझे परमभाग्य म्हटले पाहिजे. सदर प्रक्रियेत या आठवड्यात संपत पाल नावाच्या रणचंडीचे पुनश्च दर्शन झाले आणि त्यांचे कार्य व जीवनाचा प्रवास नव्याने जाणून घेता आला.
महिलांना वस्तू मानणारी मानसिकता सोबत शोषणाचा हक्क आहे असे मानणारी विकृती तर वडील-नवरा-भाऊ महिलांवर आपापलीच मालकी असल्याचा टेंभा मिरवणारी परंपरा या चक्रातून आपसूक निर्माण होते वेठबिगारी व हिंसा. जेथे अधिक मागासलेपन, तेथे अधिक शोषण हा जणू सिद्धांतच बनलेला आहे. अशाच बुंदेलखंड प्रांतात श्रीमती संपत पाल नावाची मुक्ती वाहिनी स्वतः गुलामगिरीचे जोखंड तोडून काढीत असतांनाच आपल्यासारख्या अनेक अबलांना संबला बनण्यावीण्यासाठी मदतीचा हात पुढे करून प्रेरित करीत विशाल संघटन उभे करून विकृत पुरुषी अहंकाराला आव्हान देत समस्त पुरुष प्रधान संस्कृतीला हादरून सोडते, एवढ्यावरच न थांबता शासनाच्या महिलांकरिता असणाऱ्या योजना व महिलांच्या संरक्षणार्थ तयार झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करावी म्हणून प्रशासनाला धारेवर धरते व मोठ-मोठ्या अधिकारी/पदाधिकाऱ्यांचा संपत पाल नाव ऐकताच थरकाप उडतो अशा भारताच्या सुपुत्रीस सलाम.
उपरोक्त काम चे नेतृत्व करत असताना श्रीमती संपत यांनी एक देशव्यापी “गुलाबी-गॅंग” नावाचे संघटन उभे केले आहे आणि त्या आहेत चीफ-कमांडर त्यांचा जीवन प्रवास व कार्यावर माधुरी दीक्षितचा लीड रोल असणारा “गुलाबी गॅंग” नावाचा चित्रपट देखील प्रदर्शित झालेला आहे. अनेक भाषांमध्ये त्यांचे आत्मचरित्र देखील प्रकाशित झालेले असून भारतातच नव्हे तर सात समुद्रा पलीकडे त्यांची महती पोहोचलेली आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात आलेले आहे. अशा अद्भुत व्यक्तीमत्वा सोबत सर्वोदय संकल्प शिबिराचे अनुषंगाने चित्रकूट येथे सोबत राहत आले परतीच्या प्रवासात त्यांच्या समवेत कार्यक्षेत्रात फिरत असतांना जसा वाघ जंगलातच बघावा तसा या चंडिकेचा वावर बघून अभिवादन करीत एव्हढेच म्हणालो
“कबूल हो आझादिया, तोड दो ये बेडीया,पण करो यहा अभी,पण करो यहा सभी”
भगिनी संपत ला सलाम.
साभार मा. आ. हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या फेसबुक पेजवरुन.
Discussion about this post