व्हीएसआरएस मराठी न्युज (अक्रम शेख)हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला भगवान विष्णूचा शालिग्राम अवतार आणि माता तुलसीचा विवाह केला जातो.
हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला भगवान विष्णूचा शालिग्राम अवतार आणि माता तुलसीचा (Tulsi Vivah Puja Vidhi) विवाह केला जातो. या तिथीला देवउठनी एकादशी किंवा देवोत्थान एकादशी असेही म्हणतात. या वर्षी देवउठनी एकादशी आणि तुळशी विवाह 15 नोव्हेंबर रोजी (सोमवारी) येत आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योग निद्रामधून उठतात आणि म्हणून या दिवसाला देवउठनी एकादशी असेही म्हणतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी चातुर्मास संपतो त्यामुळे मांगलिक आणि शुभ कार्याची सुरुवात होते.
देवउठनी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह केला जातो आणि प्रत्येक विवाहित स्त्रीने तुळशी विवाह नक्की केला पाहिजे असे मानले जाते. असे केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते. तसेच पूजेच्या वेळी काही विशेष गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
- या दिवशी माता तुळशीला मध आणि लाल ओढणी अर्पण करा.
- तुळशी वृंदावनात शालीग्राम ठेवा आणि नंतर तीळ अर्पण करा.
- एकादशीच्या दिवशी तुळशी आणि शालिग्राम दुधात भिजवलेल्या हळदीचे टिळक करावे.
- पूजेनंतर 11 वेळा तुळशीची प्रदक्षिणा घाला, परंतु लक्षात ठेवा की या काळात तुमच्या हातात तांदळाचे दाणे असणे आवश्यक आहे. रिकाम्या हाताने प्रदक्षिणा घालू नका.
- यानंतर नैव्यद्य अर्पण करा आणि तो कुटुंबातील सर्व सदस्यांना वितरित करा.
- पूजा आटोपल्यानंतर संध्याकाळी भगवान विष्णूला जागे होण्याचे आवाहन करा.
- काही लोक थाळी वाजवून देखील भगवान विष्णूला जागे होण्याचे आवाहन करतात.
आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शन खाली कैलास कुटे मित्र परीवार यांच्या वतिने वार्डात तुळशी रोप वाटप कार्यक्रम आयोजीत केले गेले आहे.
पर्यावरण रक्षण व आयुर्वेद संवर्धन तुळशी विवाह निमित्त तुळशी रोप वाटप उपक्रम
तुळशीचे रोप लावू दारी, लक्ष्मीसोबत,आरोग्यही लाभेल घरोघरी….
सोमवार दि. १५ नोव्हेंबर सकाळी ११वा.
स्थळ : कैलास कूटे जनसंपर्क कार्यालय, विठ्ठलमंदीरासमोर, आकुर्डी. येथे वाटप करण्यात येणार आहे.
Discussion about this post