व्हीएसआरएस न्युज पिंपरी- कोकणात महापुराने अतोनात आर्थिक हानी व जीवित हानी होवुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.कोकणावर आलेल्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी व आपल्या बांधवासाठी स्वराज्य मित्र मंडळ ,गणाध्यक्ष मित्र मंडळ व कै.किरणभाऊ काळभोर युवा मंच निगडी च्या वतीने एक हात कोकणासाठी,कोकणच्या मातीसाठी,कोकणवासीयांसाठी “या संकल्पनेद्वारे मंडळातील सदस्यांनी घासातला घास म्हणुन आर्थिक व वस्तु स्वरूपात मदत केली.
यामध्ये मंडळातिल महिलांनी
आपल्याबांधवांना मदत करण्यासाठी पुढे आले.
मंडळाकडून खेड तालुकामधील अनेक नुकसानग्रस्त गावामधील पोसरे,निवेगांव,साखर-सडेवाडी,धामनंद, केळणे तळवट जावळी ,तसेच चिपळूण मधील कळबस्ते,खेर्डी,बहादुरशेख-शंकरवाडी, पदुमलेवाडी,
येथील नुकसानग्रस्त २५० कुटुंबियांना अन्नधान्य किट व १०० कुटुंबियांना गृहपयोगी वस्तूं ( ताट,वाटी,पातेले,फुलपात्रे व तांबे) स्वरूपाची कर्तव्यारूपी मदत करण्यात आली.
पोसरे येथे जे महापुर व दरडदुर्घटनेते मृत पावले आहेत. त्या बांधवांना स्वराज्य मित्र मंडळ ,गणाध्यक्ष मित्र मंडळ व कै किरणभाऊ काळभोर युवा मंच निगडी च्या वतीने भावपुर्ण आदरांजली व्यक्त करण्यात आली.
या मदत कार्यात स्वराज्य मित्र मंडळ चे अध्यक्ष श्री. स्वप्निलभाऊ पवार, सागर कांबळे,अभिमन्यू बोंबे,संतोष धोंगडे, विश्वजित कदम, बाळु कांबळे व ४० ते ४५ युवा पदाधिकारी,सहकारी यांनी मदतीचे नियोजन व योगदान केले.
Discussion about this post