व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे) पद्मवती रस्ता चौक ते वडगांव रस्त्यावरील सिद्धिविनायक मंगल कार्यालया जवळील पुढील भाग व वडगांव चौक ते पदमावती रस्ता चौक जवळील मिठाई दुकानापर्यंत च्या लगतच्या एका बाजूच्या फुटपाथवर अजूनही ब्लॉक बसवण्यात आलेले दिसून येत नाहीत.
ब्लॉक बसवण्याचे काम गेल्या वर्षांपासून रखडल्याचे दिसत आहे .पदमावती रस्ता व सिद्धिविनायक कार्यालया जवळी ल काही अंतरावर गटारी चे पाणी सारखे तुंबून रस्त्यावर येत असल्याने मागील वर्षी मे महिन्यात ड्रीनेज पाईपलाईन,चेंबर ही कामे येथे एका बाजूने करण्यात आलेली आहेत. फुटपाथ वर ब्लॉक नसल्याने काही ठिकाणी फुटपाथवरच कचऱ्याचे दररोज ढीग दिसून येत आहेत व तेथेच फुटपाथवर च काहींनी टपऱ्या,बाबूंच्या सहाय्याने दुकाने थाटून पूर्ण फुटपाथ च बंद केलेला दिसून येत आहे.आळंदी शहरात बरेच ठिकाणी फुटपाथवर च टपऱ्या, (हॉटेल गुऱ्हाळ ई.)बांबूच्या सहाय्याने व्यवसायिकांनी अतिक्रमण थाटलेली दिसून येत आहेत.नगरपालिकेचे मात्र या कडे दुर्लक्ष दिसत आहे.फुटपाथ अतिक्रमण कारवाईबाबत आळंदी मनसे शहर अध्यक्ष अजय तापकीर यांनी मागील मार्च महिन्यात नगरपरिषदेला निवेदन दिले होते.आळंदीत तीर्थक्षेत्र विकास आराखडया मार्फत विविध ठिकाणी कामे झाली आहेत. पण सध्या पदमावती रस्ता चौक ते सिद्धिविनायक कार्यालयाच्या ही पुढील भागात फुटपाथवर ब्लॉक बसवण्यात न आल्याने नागरिकांना रस्त्यावरून च चालावे लागते .दिवसभर वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात चालू असते.फुटपाथ दुरवस्थेत असल्याने व त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने लहान मुलांना व वृद्ध व्यक्तींना ही या वाहनांच्या रहदारीच्या रस्त्यावरूनच नाईलाजास्तव चालावे लागत आहे .
निदान प्रशासनाने ब्लॉक बसवले तरी तेथील अतिक्रमणे कमी होतील व कचऱ्याचे काही ठिकाणचे असणारे ढीग ही कमी होऊन नागरिक फुटपाथवरुन चालतील अशी आशा आळंदीतील नागरिकांनी व्यक्त केली आहे.सध्या जर फुटपाथवर ब्लॉक बसवण्यात येत नसतील तर त्या बाजूची पूर्ण अतिक्रमणे काढून नागरिकांना येण्या जाण्यासाठी तो फुटपाथ तरी मोकळा हवा अशी नागरिकांची इच्छा आहे.
Discussion about this post