व्हीएसआरएस मराठी न्युज –(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी: मा.सर्वोच्च न्यायालयाने SPL क्र.१९७५६/२०२१ मधील दि.४/०५/२०२२ च्या आदेशास अनुसरन राज्य निवडणूक आयोगाच्या दि.१०/०३/२०२२ रोजी सुरू असलेल्या टप्प्यांपासून
निवडणूकांची कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
यास अनुसरून प्रारूप रचनेवर आक्षेप व हरकती पासून प्रभाग रचनेच्या अनुषंगाने सुधारित कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग ,महाराष्ट्र यांच्या पत्रा द्वारे आळंदी नगरपरिषदेने जाहीर केला आहे.
१० मे ते १४ मे या कालावधीत प्रारूप प्रभागरचनेवर नागरिकांनी हरकती व सूचना करता येणार आहे.हरकती व सूचनांवर जिल्हाधिकारी २३ मे रोजी सुनावणी घेणार आहेत. त्यावर अभिप्राय नोंदवून तो अहवाल ३० मे ला विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे.संबंधित विभागीय आयुक्त अंतिम प्रभाग रचनेस ६ जुन पर्यंत मान्यता देणार आहे.
७ जुन स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, वृत्तपत्रात व नगरपरिषदेच्या वेबसाईटवर प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना प्रसिध्द केली जाणार आहे.
Discussion about this post