व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-
आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय देण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर पासून मुंबईपर्यंत ६९०० किमीचा प्रवास करणार आहे व मुंबईत महारॅली होणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेसच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परीक्षेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, गोवा दिव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, खासदार कुमार केतकर, माजी मंत्री नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, बस्वराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, डॉ. विश्वजित कदम, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड, AICC चे सचिव सोनल पटेल, आशिष दुआ, संपतकुमार, माजी खासदार हुसेन दलवाई, संजय निरुपम, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एससी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे,
अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आ, वजाहत मिर्झा, NSUI चे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, उपाध्यक्ष नाना गावंडे, सरचिटणीस प्रमोद मोरे, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांच्यासह सर्व प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आमदार अभिजित वंजारी यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी केले. तर पत्रकार परिषदेत भारत जोडो न्याय यात्रेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
Discussion about this post