व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी(प्रतिनिधी) विद्यानंद शाळेत प्रवेश घेण्यासाठी जसे पालक गर्दी करतात, अशीच येत्या दोन वर्षात पालिकेच्या शाळेतही प्रवेश घेण्यासाठी गर्दी करतील.असा विश्वास व्यक्त करीत मुलींनो कोणतेही शिक्षण घ्या, मात्र आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. असा सल्ला आयुक्त शेखर सिंग यांनी दिला.
निगडी येथील विद्यानंद भवन हायस्कुलच्या वतीने ” अचिव्हमेन्ट ऑफ़ इंडिया” या थीमवर आयोजित केलेल्या स्नेह संमेलनात ते बोलत होते.
यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी गजानन नारकर, शाळेच्या विश्वस्त सुप्रिया चव्हाण पाटील, श्वेता चव्हाण पाटील,डॉ. जे.जी पाटील, प्रो.डी. आर. करनुरे, छाया हब्बू,मुख्याध्यापक सिरिल जगन, सीबीएसईच्या मुख्याध्यापिका क्षितीजा मिसाळ, प्रीती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
आयुक्त सिंग पुढे म्हणाले कि, सोशल मीडियाच्या वापरामुळे आपले चरित्र किंवा आपल्या मानसिकतेवर परिणाम होतो. यामुळे विद्यार्थ्यांनी किमान दहावी पूर्ण होईपर्यंत तरी सोशल मीडियावर सक्रिय होवू नये.कारण तुम्ही किशोरवयीन असतात. पालकांनी एक लक्षात घेतले पाहिजे कि, आपण मुलांची फि भरली म्हणजेच निर्धास्त राहू नका, पालक म्हणून शिस्त लावलीच पाहिजे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि पालक यांच्यात समन्वय असला पाहिजे. पालकांनी एकदम कडक शिस्तशीर राहून चालत नाही, मुले घडविताना पालकांनी एक शिल्पकाराची भूमिका घेतली पाहिजे.आज सर्वाधिक बक्षिसे घेण्यात मुलींनी बाजी मारली हे मुलांसाठी धोक्याची घंटा आहे. असा इशारा त्यांनी शेवटी दिला.
यावेळी श्रेयस उदगी याने राष्ट्रीय पातळीवर विजेत्या भरड धान्याचे महत्त्व या प्रकल्पाची माहिती दिली.
सांस्कृतिक कार्यक्रमात ६०० विद्यार्थ्यांनी भरड धान्याचे महत्त्व ते चांद्रयान3 यशस्वी प्रवास दाखवला. तंत्रज्ञानाच्या काळात मोबाईल चा अतिवापर किती घातक आहे आणि मोबाईल चा माफक वापर गरजेचा कसा ? हे सांगणारे
मूकनाट्य सर्वांना अवाक् करून गेले. यावेळी आदर्श शिक्षिका म्हणून दिपाली वानखेडे, ग्रंथपाल मंजुषा करमाळकर आणि सेवक बापू मोहिते यांचा सन्मान करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन किरण पाटील, चेतना चंदन, गणेश रेड्डी, तन्वी चौरे या विद्यार्थ्यांनी केले.प्रास्ताविक पर्यवेक्षिका मनीषा सुर्वे तर आभारप्रदर्शन सरोज सुळगिकर यांनी केले
Discussion about this post