व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)आळंदी:-यंदा चा आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील चांदीच्या रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान शेतकरी श्री पांडुरंग तुकाराम वरखडे व श्री तान्हाजी आनंदराव वरखडे या आळंदीतील वरखडे कुटुंबीयांच्या सोन्या माऊली बैलजोडीस मिळाला आहे.फुरसुंगीतील आप्पासाहेब खुटवड यांच्या कडून
तीन लाख एकावन्न हजार रुपयांना ही बैलजोडी विकत घेतली याची माहिती श्री पांडुरंग तुकाराम वरखडे यांनी यावेळी दिली.
आळंदीतील कारवा धर्मशाळे जवळ असणाऱ्या त्यांच्या शेतात देखभाली ची व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या रोजच्या आहारात कडबा, मका ,शेंगदाणा पेंड,वैरण ई.समावेश करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Discussion about this post