व्हीएसआरएस मराठी न्युज –बुलढाणा: दि-२२ आँगस्ट (साेमवार) :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त माेताळा तालुक्यात काँग्रेसच्या वतीने ” आझादी गौरव-सद्भावना पदयात्रे’ चे आयाेजन करण्यात आले हाेते. काँग्रेसचे नेते तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव श्री.हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली या पदयात्रेचे आयाेजन करण्यात आले हाेते.
15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) ते 20 ऑगस्ट 2022 सद्भावना दिन” असे एकूण ६ दिवस या पदयात्रेचे आयाेजन करण्यात आले हाेते. माेताळा तालुक्यातील अनेक गावात ही पदयात्रा पाेहचली. जवळपास 105 ककिलोमीटरचे अतंर पार केले. एखाद्या ठराविक गावात या पदयात्रेचा मुक्काम असायचा. श्री. हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी या पदयात्रेत सक्रिय सहभाग घेवुन नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य लढा, संविधान यासह महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. काँग्रेस पदाधिकारी मंडळीसह परीसरातील नागरीकांनी या पदयात्रेत माेठ्या संख्येने सहभागी हाेवुन आपला माेठा प्रतिसाद दिला.
२० तारखेला माेताळा येथील युवा संवाद या कार्यक्रमाने या पदयात्रेची समाप्ती झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लाेंढे यांनी शेवटच्या दिवशी हजर राहून युवकांशी संवाद साधला. काँग्रेसचे युवा नेते इरफानभाऊ पठाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी युवा संवाद हा कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणला.
Discussion about this post