व्हीएसआरएस मराठी न्युज –भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेने फलंदाजांनी गुडघे टेकल्यानंतर भारतीय फलंदाजांनी अवघ्या ६ ओव्हरमध्येच हा सामना जिंकला. या सामन्यातसामनावीर शुबमन गिल १९ चेंडूत २७ धाव केल्या तर ईशान किशन याने १८ चेंडूत २३ धावा केल्या.
अवघ्या ५१ धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून ईशान किशन आणि शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली व त्यांनीच सामना जिंकला.
या सामन्यात मोहम्मद सिराज याच्या बॉलिंगसमोर श्रीलंकाचा अवघ्या ५० धावांवर बाजार उठला आहे. त्यामुळे भारताला विजयासाठी ५१ धावांचे आव्हान मिळाले होते. भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्या याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जसप्रीत बुमराहने १ विकेट घेत चांगली साथ दिली.
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात सिराज याने एकाच षटकात चार विकेट घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले आहे. त्याच्या या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. त्याने श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडले. त्याच्या या दमदार कामगिरीचे कौतुक होत आहे.या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या जसप्रीत बुमराह याने श्रीलंकेचा सलामीवीर कुसल परेरा याला पहिल्याच षटकात आऊट केले. त्यानंतर मोहम्मद सिराज कमाल केली. मोहम्मद सिराज त्याचे दुसरे षटक टाकण्यासाठी आला. त्याने यावेळी पहिल्याच चेंडूवर पथुम निसांका याला दोन धावांवर रविंद्र जाडेजा याच्या हातून झेलबाद केले.
Discussion about this post