व्हीएसआरएस मराठी न्युज –ये घर मुझे 19 साल के लिए हिंदुस्तान की जनता ने दिया, मैं उनका धन्यवाद करना चाहता हूं।
सच की आवाज़ और जनता के मुद्दे दोगुने ज़ोर से उठाता रहूंगा।
काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी खासदारकी गमावल्यानंतर सरकारी बंगला रिकामा केला आहे. त्यांनी १२, तुघलक लेन बंगल्याच्या चाव्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्या आहेत. सत्य बोलण्याची किंमत चुकवावी लागली आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. देशातील जनतेमुळे या निवासस्थानी राहायला आलो होतो. १९ वर्षे या घरात राहिलो, असेही ते म्हणाले. तसेच राहुल गांधी यांनी जी विधाने केली ती सत्यच आहेत. सरकारच्या विरोधात बोलल्यानेच राहुल गांधींवर आज ही वेळ आली आहे. राहुल गांधी खूप धाडसी आणि संयमी आहेत.
आपले निवासस्थान बदलल्यानंतर राहुल गांधी त्यांची आई आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांच्या १० जनपथ या निवासस्थानी राहतील.
Discussion about this post