व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
१मे महाराष्ट्र दिनानिमित्त आळंदी नगरपरिषद,आळंदी पोलीस ठाणे,मंडल आधिकारी व तलाठी कार्यालयात आज ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले.संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या वीर सुपुत्रांच्या त्यागाच स्मरण करून त्यांना अभिवादन केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेना ,सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटने तर्फे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार व पुष्प अर्पण करण्यात आले.या निमित्ताने आळंदी शिवसेना प्रमुख अविनाश तापकीर,उपप्रमुख शशिकांत राजे जाधव ,रमेश गोगावले,चारुदत्त रंधवे व इतर शिवसैनिक ,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.बेळगाव सहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मागणी यावेळेस शिवसैनिकांनी केली.
१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सिद्धार्थ ग्रुप ने संध्याकाळी ६:३०वा. इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सर्व मुस्लिम बांधव व आळंदीतील नागरिकांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे उपस्थित राहण्याची विनंती त्यांनी आज केली आहे.
Discussion about this post