व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी शहरात आगीची तीसरी घटना घटल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते साधन सुविधा व आस्थापना आळंदी शहर अध्यक्ष किरण प्रकाश नरके यांच्या वतीने आळंदी नगरपालिकेचे मुख्याआधिकारी अंकुश जाधव यांना मनसे जिल्हा अध्यक्ष सचिन भांडवलकर व उपाध्यक्ष अविनाश लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२७ बुधवार रोजी निवेदन देण्यात आले.
आळंदी शहरातील ही तिसरी घटना असून अग्निशमन दलात पूर्ण प्रशिक्षित कर्मचारी कायम स्वरूपी भरती करावेत.अग्निशमन दलाची गाडी अत्याधुनिक पध्दतीचे साहित्य उपकरणे वापरण्यात यावे.तसेच कर्मचाऱ्यांना उच्चदर्जाचे फायरकोट, हेल्मेट, बूट,गणवेष इ.आवश्यक साहित्य द्यावीत.गावठाण आगीच्या घटना घडली असता क्षीरसागर कुटूंबातील लोकांचे आर्थिक नुसकान भरपूर झाल्याने त्यांना जास्तीत जास्त आर्थिक स्वरूपात निधी मिळावा यासाठी मदत करावी.अग्निशमन दलात भरती करताना स्थानिक युवकांना
प्रथम प्राधान्य देण्यात यावे.प्रसाद बोराटे,अमित घुंडरे,पोलीस प्रशासन व आळंदी ग्रामस्थ हे वेळोवेळी आग दुर्घटनेच्या वेळी उपस्थित असतात व नगरपरिषदेस सहकार्य मदत ही करत असतात.असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.अग्निशमन दलातील त्रुटी,अग्निशमन दलात स्थानिक प्रशिक्षित युवकांचा समावेश व आग दुर्घटनेत आर्थिक हानी झालेल्या क्षीरसागर कुटूंबियांना नुसकान भरपाई या विषयांवर हे निवेदन नगरपालिकेस दिले गेले.यावेळी मुख्याधिकारी म्हणाले वरिष्ठ कार्यालयात योग्य तो अहवाल ,पोलीस पंचनामा सादर करून जास्तीत जास्त प्रमाणात आर्थिक मदत मिळून देण्याचा प्रयत्न त्या कुटुंबियांना करू. अग्निशमन दलाच्या कर्मचारी भरती विषयी जिल्हाधिकारी कार्यालयाशी योग्य तो पत्रव्यवहार केला जाईल असे त्यावेळेस त्यांनी सांगितले.अशी माहिती मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना शहराध्यक्ष यांनी दिली.
यावेळी महिला आघाडीच्या सचिव शुभांगी यादव, उपसचिव कृपाली गायकवाड, शहादेव गोरे,अभिषेक नाणेकर, प्रदीप रत्नपारखी व इ. मनसैनिक उपस्थित होते.
Discussion about this post