मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल २१ मार्च रोजी ईडीने मद्यधोरण घोटाळा प्रकरणात अटक केल्यानंतर आता या विषयी प्रतिक्रिया राजकीय गोटात उमटू लागल्या आहेत.
देशभरातील सर्व विरोधीपक्षांनी केजरीवाल यांच्यावरील कारवाईचा निषेध नोंदविला असून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या बाबतीत आपले मत प्रदर्शित केले असून केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करत भाजपवर टीका केली आहे.
प्रत्येक राज्याच्या मंत्रिमंडळाला धोरणे बनविण्याचा अधिकार असतो. त्यासाठी अधिकृत यंत्रणा असते. त्यात काही त्रुटी असतील तर भाजपने जनतेत जाऊन या प्रश्नाला वाचा फोडावी. किंवा, जरूर भासल्यास न्यायालयात जावे. आधीच या प्रकरणात दोघा तिघांना अटक करण्यात आली आहे.आता राज्याच्या मुख्यमंत्र्यालाच अटक केली आहे. राज्याचे धोरण ठरवले म्हणून अशी अटक करणे बरोबर नाही.
या घटनेचा केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला तोटा न होता फायदाच होईल. त्यांचे उमेदवार सर्वच जागांवर जिंकतील.भाजपला यावेली दिल्लीत एकही जागा मिळणार नाही.
यापूर्वी अशाप्रकारची वर्तणूक कोणत्याही सरकारने केलेली नाही हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. आम्ही सर्व विरोधीपक्ष केजरीवाल यांच्या पाठीशी आहोत. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Discussion about this post