New Delhi : नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यामुळे ते सतना आनि रांचीतील रॅली आणि जाहीरसभांना गैरहजर राहणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि जयराम रमेश यांनी ही माहिती दिली आहे.
रांचीतील इंडिया गठबंधनाच्या रॅलीमध्ये आज राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आपचे खासदार संजय सिंह, लालुप्रसाद यादव, फारुख अब्दुल्ला, खिलेश यादव, तेजस्वी यादव, प्रियांका चतुर्वेदी, दीपशंकर भट्टाचार्य आदी सहभागी होणार होते. मात्र, राहुल यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना दिल्लीबाहेर जाण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. त्यामुळे ते या कार्यक्रमाला गैरहजर राहणार आहेत.
जयराम रमेश यांनीही एक्स हँडलवरून ही माहिती दिली आहे.
Discussion about this post