पिंपरी : जितेंद्र आव्हाड यांनी भगवान श्रीराम यांच्याबाबतीत केलेले विधान अत्यंत मूर्खपणाचे आणि खेदजनक आहे.आव्हाड मानसिकदृष्ट्या आजारी असून त्यांना उपचाराची गरज आहे; अशी टीका भाजप पिंपरी विधासभाप्रमुख अमित गोरखे यांनी केली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिषदेत प्रभू श्री राम यांच्याबद्दल ‘राम शाकाहारी नसून मांसाहारी होते, त्यांनी १४ वर्षांचा वनवास भोगला, मग ते शाकाहारी कसे असतील?अनेक इतिहास आपल्याला आठवत नाहीत किंवा वाचताही येत नाहीत. जे शिकार करून खातात त्यांचा राम, आम्हा बहुजनांचा राम’ असे म्हटले होते. या खेरीज ‘रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार लादला जात आहे.’ असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. हिंदुधर्मियांमध्ये संताप व्य्क्त केला जात होता. त्यानंतर आव्हाड यांनी या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
दरम्यान गोरखे यांनी आव्हाड यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्या उपलब्ध असलेल्या वाल्मिकी रामायणासह १४ रामायणात कोठेही श्रीराम मांसाहारी होते असा उल्लेख नाही. मात्र, त्यांनी कंदमुळे खाऊन वनवास भोगला असल्याचा उल्लेख आहे. असे असताना अशी विधाने करणे हे आव्हाडांच्या विकृत मानसिकतेचे निदर्शक आहे.
संपूर्ण देशात भगवान श्रीरामाचे वातावरण पाहून अनेक राजकारणी मानसिक आजारी पडले आहेत. हा त्याचाच एक भाग आहे, विकृत मानसिकता आणि श्रीरामाचा अपमान करण्याचा प्रयत्न जनतेने अनेकदा अनुभवला आहे, अशा श्रीरामविरोधी आणि हिंदुद्वेष्ट्यांना धडा शिकवला जाईल. असा इशारा भाजप पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी दिला.
Discussion about this post