Pimpri News : पिंपरी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पिंपरी चिंचवड शहरात जागोजागी दिसणारे राजकीय दादा, भाऊ, शेठ, ताईंचे फलक काढण्यास सुरुवात झाली आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने फलक काढण्याच्या कामास सुरुवात केली आहे.आकाशचिन्ह विभागाची धुरा वाहणारे उपायुक्त संदीप खोत यांनी ही माहिती दिली.
तर, राजकीय नेत्यांनी आचारसंहितेच्या कार्यकक्षेत राहून पूर्वपरवानगी घेऊनच फलक लावावेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी दिला आहे.
Discussion about this post