व्हीएसआरएस मराठी न्युज -भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहर-जिल्हा काँग्रेसच्या वतीने देशातील द्वेषपूर्ण राजकारणाच्या विरोधात 7 ऑगस्ट (रविवारी) रोजी सकाळी 7.30 वा मैत्र सद्भाव सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.
ही रॅली काँग्रेस भवन – शनिवार वाडा – शिवाजी रोड – स्वारगेट चौक – सारसबाग – टिळक रोड मार्गे गुडलक चौक येथे समाप्त होणार आहे. त्यानंतर क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येस सोमवारी (8 ऑगस्ट) सायं. 6.30 वा., काँग्रेस भवन येथून क्रांतिज्योत यात्रा काढण्यात येणार आहे.
ही ज्योत यात्रा काँग्रेस भवन – मनपा भवन – शनिवार वाडा – लाल महाल – हुतात्मा कर्णिक स्मारक – बेलबाग चौक – हुतात्मा बाबू गेनू स्तंभ मंडई अशी निघणार आहे. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी शहरात पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी होणार आहेत. याशिवाय छायाचित्र प्रदर्शन, ध्वजवंदन, देशभक्तीपर चित्रपट दाखवणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.
अमृत महोत्सवानिमित्त काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी काँग्रेस भवन येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत लोंढे बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी तसेच पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post