व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -विश्व मैत्री संघ कार्याध्यक्ष डॉ. लालबाबू गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राजभवन, मुंबई येथे राज्यपालांची भेट घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राष्ट्र गौरव पुरस्कार, शाल, पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राष्ट्र गौरव पुरस्कार, शाल, पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांचा सन्मान स्वीकारताना राज्यपालांनी मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रगौरव पुरस्कार हा माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान, अतुलनीय असेल, असे राज्यपाल म्हणाले. कारण या पुरस्कारामध्ये राष्ट्राभिमानाची, राष्ट्र उभारणीची संकल्पना आहे, एकता, बंधुता, देशभक्ती, समाजाप्रती भक्तीचा संदेश आहे. राष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडल्याची माहिती मला मिळाली आहे. सर्व मान्यवर उपस्थित होते.
देशभक्तीपर आणि धार्मिक कार्यक्रमांचा अप्रतिम संगम प्रेक्षकांना पाहायला मिळाला. संपूर्ण सभागृह प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. या कार्यक्रमातून समाजात आणि राष्ट्रात चांगला संदेश गेला. असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. समाज, राष्ट्र आणि धर्मासाठी आपापल्या क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करणाऱ्यांना राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मी सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन करतो, आशा करतो की अशाच प्रकारे राष्ट्र उभारणीचे कार्य पुढेही चालत राहावे. असे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितले.
भविष्यात तुमच्या कार्यक्रमांना नक्की येईन – राज्यपाल
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विश्व मैत्री संघ कार्याध्यक्ष डॉ. लालबाबू गुप्ता यांना आश्वासन दिले की, भविष्यात तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन कराल तेव्हा मी त्या कार्यक्रमाला नक्की येईन.
राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित व्यक्तींची नावे:
1008 महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्तवी (इंदूर, वृंदावन) भिकू इदाते (अध्यक्ष-भटकी जमाती कल्याण मंडळ भारत सरकार) एल. निशिकांत सिंग (माजी लेफ्टनंट जनरल, मणिपूर) नितीन मोरे (स्वामी समर्थ केंद्र, त्र्यंबकेश्वर, दानशूर) राजेश पांडे (पुणे विद्यापीठ) हर्षवर्धन सपकाळ (माजी आमदार) विजय चौधरी (सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे) रामदास चव्हाणके (संचालक-सुदर्शन न्यूज चॅनल) ओमप्रकाश रांका (गोसेवक, उद्योजक) डॉ.प्रमोद लोहार) डॉ.मनिष गवई (समाजसेवा व युवा मार्गदर्शक) अजित ओझा (सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक) राजेश बडगुजर (संस्थापक अध्यक्ष-वाल्मिकी समाज संस्था).
27 मार्च रोजी चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात राष्ट्र गौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये देशातील महान व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. मात्र अचानक काही कारणास्तव राज्यपाल कार्यक्रमाला पोहोचू शकले नव्हते .
Discussion about this post