व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी :-महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेचा आज ऑनलाइन निकाल जाहीर झाला. आळंदी देवाची येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज मधील एकूण १९७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात १५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा ७९.६९% निकाल लागला. त्यामध्ये विद्यालयाचा कला शाखेचा निकाल ७१.४२% लागला तर वाणिज्य शाखेचा निकाल ८९.४७% लागला आहे.
कला शाखेत १)सोहम रामराव देशमुख याने ५१०/६०० (८५%) गुण मिळवून प्रथम २)शुभम हनुमंत राऊत याने ४५९/६०० (७६.५०%) गुण मिळवून द्वितीय तर ३)मुकुंद विठ्ठल इंगळे याने ४०१/६०० (६६.८३%) गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. तसेच वाणिज्य शाखेत १)वैष्णवी पद्माकर मुळे या विद्यार्थिनीने ४९९/६०० (८३.१७%) गुण मिळवून प्रथम क्रमांक, २)सविता पांडुरंग ढेंबरे या विद्यार्थिनीने ४८३/६०० (८०.५०%) गुण मिळवून द्वितीय तर ३)ज्ञानेश्वर बिरू घोडके या विद्यार्थ्याने ४५९/६०० (७६.५०%) गुण मिळवून तृतिय क्रमांक मिळवला.
इयत्ता बारावी वाणिज्य आणि कला मध्ये प्रथम ,द्वितीय,तृतीय क्रमांकाने यश प्राप्त केलेल्या व इतर सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.तसेच मुख्याध्यापक व वर्गशिक्षक ,गुणवत्ता वाढ समिती,संस्थेचे सर्व पदाआधिकरी वर्गाचे ही अभिनंदन करण्यात आले. अशी माहिती ज्ञानेश्वर विद्यालयाचे सचिव अजित वडगांवकर यांनी दिली.
Discussion about this post