व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी – शहरात जागोजागी वाहतुकीच्या समस्या भेडसावत आहे. तथापि, पालिका व वाहतूक पोलिसांचा फक्त बैठकांवर जोर आहे.
शहरातील असा एखादाच भाग असेल, त्या ठिकाणी वाहतुकीशी संबंधित समस्या नसेल. तथापि, याविषयी फक्त बैठका होतात. प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार करण्यात येते. पोलीस व महापालिकेने एकत्र येऊन त्यावर उपाययोजना करण्याचा यापूर्वीच निर्णय घेतला.
पालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, डॉ. सागर कवडे, सतीश माने यांच्यासह पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहनतळ धोरणाची १९ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने पालिका व पोलिसांकडून संयुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रिक्षा थांब्यांचे सर्वेक्षण होणार असून आवश्यकतेनुसार त्यांचे स्थानांतरण करण्यात येणार आहे. याशिवाय, पदपथांवरील अतिक्रमण प्राधान्याने काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पादचारी मागार्वरील अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे तसेच यापुढे पदपथावर अतिक्रमणे होणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी बैठकीत दिले. आतापर्यंत अशाप्रकारचे आदेश पालिका मुख्यालयातून अनेकदा देण्यात आले. प्रत्यक्षात शहरभरात पदपथांवर जागोजागी अतिक्रमणे आहेत, ती कमी होण्याऐवजी वाढताना दिसतात.
Discussion about this post