व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -गुडीपाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्याला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी ठाण्यात आज उत्तर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारला अल्टीमेटम दिला आहे.
मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं, अशी आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. मुंब्र्यातून अटक अतिरेक्यांची यादी राज ठाकरेंनी वाचून दाखवली.
3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, आम्हाला कुठलीही तेढ निर्माण करायची नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला अल्टीमेटम दिला आहे.
दरम्यान, प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवावा रस्त्यावर आणू नये. मी अजून बाण काढला नाही, मला काढायला लावू नका, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथील ‘उत्तर’सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली. या टीकेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
वारसा प्रबोधनकार ठाकरे यांचा मात्र विचारसरणी नथुराम गोडसे याची, अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी राज ठाकरेंवर केली आहे.
Discussion about this post