व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-दि.१५ इंद्रायणी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढून जलपर्णी मुळे पुलाला कश्या ही प्रकारचा धोका होऊन नये म्हणून चाकण चौक येथील पुलालगत नदीपात्रातील पोकलैंड सहाय्याने जलपर्णी काढण्याचे काम पुलावरून सुरू करण्यात आले.तसेच नंतर इंद्रायणी नगर रस्त्यावरून नदीपात्रातील जलपर्णी पोकलैंडच्या सहाय्याने काढत होते.
पोलीस बंदोबस्तात
येथील पूला वरील वाहतूक काही वेळ बंद ठेवण्यात आली होती.
नदीपात्रात जलपर्णीचा मोठ्या प्रमाणात थर येथे साठला होता.
Discussion about this post