व्हीएसआरएस मराठी न्युज -आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये नियोजन बैठक पार पडली.
संभाव्य वारकऱ्यांची आणि भाविकांची संख्या विचारात घेऊन पोलिस यंत्रणेने कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेचे नियोजन केले आहे, अशी माहिती पोलिस उपआयुक्त मंचक इप्पर यांनी दिली.
बैठकीस संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख, पोलिस, महापालिका, वीज वितरण कंपनी, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. पालखी सोहळा प्रमुखांनी बैठकीत विविध सूचना मांडल्या.
पालखी मार्गावरील राडारोडा उचलावा, पालखी मार्गावरील खड्डे बुजवावेत, मुक्काम, पालखी प्रवास आणि विसाव्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तसेच फिरत्या शौचालयांची पुरेशी व्यवस्था करावी, मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आंघोळीची सोय असावी, दिंड्यांच्या स्वागतासाठी घेण्यात येणाऱ्या भेटवस्तू ऐवजी वृक्षारोपन करावे तसेच पालखी सोबत पिण्याच्या पाण्याचे टॅंकर, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन आदी सुविधा द्याव्यात, तळवडे येथे स्वागत कमान उभारावी, आळंदी येथे फिरत्या शौचालयांची व्यवस्था पुरवावी आदी सूचनांचा समावेश होता.
यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, विश्वस्त भानुदास महाराज मोरे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त प्रा.डॉ.अभय टिळक, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर, महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय, सहशहर अभियंता श्रीकांत सवने, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post