व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी(प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना वाहतुक नियमांचे धडे देण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम ताथवडे येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये राबवण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त(वाहतूक) सतीश कसबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे, सहाय्यक पो. निरीक्षक प्रशांत अंभोरे,वरिष्ठ पो.दीपक गायकवाड आदी उपस्थित होते.
प्राचार्य ॲग्नेल कार्व्हालो यांनी स्वागत केले.
सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश कसबे म्हणाले कि, पोलीस दल हे समाजाचे संरक्षणासाठी कायदा व सुव्यवस्था पाळण्यासाठी सदैव कार्यरत असते,तेव्हा सर्व जनतेचा पोलीस दलांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असावा अशी इच्छा व्यक्त केली. भारतामध्ये अपघातात निधन पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे कारण अपघातानंतर नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळण्यास विलंब होतो. पोलिसांबद्दल नकारात्मक विचार आणि प्रसार न करता वस्तुस्थिती जाणून घ्यावी. आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी काटेकोरपणे कायद्याचे व वाहतुकीचे पालन केले पाहिजेत. वाहन चालवताना वेग मर्यादेचे पालन केल्यास अपघात होणार नाही, सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्यास वाहतूक कोंडी होणार नाही . चालताना पदपथाचा आणि रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा. पोलीसांवरील ताण कमी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
वाहन चालवण्याच्या परवान्या बद्दल वयोमर्यादेची माहिती देऊन विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन मार्गदर्शन केले.
श्री. साळुंखे म्हणाले कि, नकळत सामाजिक माध्यमाद्वारे विविध गुन्ह्यांमध्ये कसे अडकत जातो व त्यांचे परिणाम किती गंभीर आणि भयंकर असू शकतात. विद्यार्थ्यांनी फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम यासारखे सामाजिक माध्यम वापरताना काळजी घ्यावी. समाज माध्यमावर टाकलेले फोटो चुकीचे किंवा नको असलेल्या ठिकाणी वापरून आपली व आपल्या कुटुंबाची होणारी बदनामी नुकसानदायक ठरू शकते .विद्यार्थ्यांनी अभ्यास व खेळावर लक्ष केंद्रित करावे.असा सल्ला दिला.
सायबर क्राईम बद्दल बोलताना श्री. खराडे यांनी अनोळखी लिंक वरती न जाता आपले ओटीपी किंवा पासवर्ड दुसऱ्यांना न सांगता आपण कसे सुरक्षित राहू शकतो याबद्दल मार्गदर्शन केले. आपण आपल्या पालकांशी व शिक्षकांशी समाज माध्यमांच्या वापराबद्दल चर्चा करावी. वाईस मेल आपण वापरू नयेत कारण यामुळे आपल्या मोबाईलच्या सुरक्षिततेशी तडजोड करत असतो. तेव्हा आपण आपल्या समाज माध्यमावरील संभाषणाची माहिती सर्वांना द्यावी आणि अनओळखीच्या नंबर वरून आलेला फोन तसेच लिंक बद्दल सुद्धा पालकांशी आणि शिक्षकांशी चर्चा करून मार्गदर्शन घ्यावे.
कार्यक्रमाचे शेवटी प्राचार्य अॅग्नेल कार्व्हालो यांनी पोलीस दलाच्या पथकाचे आभार मानत मुलांकडून सामाजिक माध्यम सोशल मीडियाची खाती बंद करण्याचे तसेच वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळण्याचे व अनोळखी फोन आणि लिंक स्वतःच्या किंवा आई-वडिलांच्या मोबाईलवरून न वापरण्याची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
Discussion about this post