व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:- दि.९ इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली असून भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला आहे. इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळी वाढलेली पाहता व आळंदी नगरपरिषदेने जुन्या नगरपालिका चौकातून नदी कडे जाणाऱ्या मार्गावर पत्रे लावून नागरिकांच्या दक्षतेसाठी सूचना फलक लावला आहे.
कालच्या व्ही एस आर एस च्या बातमी ची दखल घेत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
इंद्रायणी नदीचे पाणी वाढल्याने अनेक नागरिक ते पाहण्यासाठी घाटावरती येत आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत असल्याने इंद्रायणी नदी घाटा जवळ पोलीस प्रशासन येऊन नागरिकांना नदी घाटावर न थांबण्याच्या सूचना व आदेश देत आहेत.नागरिकांच्या येण्या जाण्यासाठी असणारा नदीपात्रा वरील भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला आहे. दक्षतेचा उपाय म्हणून प्रशासनाने पुलावरील नागरिकांची ये-जा बंद केली आहे.
Discussion about this post