व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:-दि.१० भामा-आसखेड पाणीपुरवठा मुख्य विभागातच विद्युत वहिनी मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने आज सकाळ पासून गावठाण विभागात
पाणीपुरवठा झाला नाही.भामा आसखेड मुख्य विभागातील विद्युत वहिनी मधील तांत्रिक दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर आळंदी शहराला पाणीपुरवठा होणार आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सोनटक्के यांनी दिली.
एप्रिल महिन्यात भामआसखेड मुख्यविभागात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने आळंदी शहराला
सलग चार दिवस पाणीपुरवठा होऊ शकला नाही.त्यामुळे आळंदी शहरात नागरिकांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागले होते.
आषाढी वारीला ११ दिवसच बाकी राहिले आहेत. प्रांत आधिकारी यांच्या बैठकीत किमान आषाढी वारीकाळात शहरात पाणीपुरवठा दररोज नियमित व्हावा यासंबंधी
नगरपालिका प्रशासनास
आदेश देण्यात आले होते.पुण्यातल्या बैठकीत ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आळंदी शहराला पाणीपुरवठा दररोज नियमित व्हावा यासाठी त्यासंबंधीत आधिकाऱ्याला धारेवर धरले होते.आळंदी पाणीपुरवठा केंद्रातून एम.जी.पी. ने च यात्रा कालावधीत पाणीपुरवठा करावा त्याबाबत सूचना ही द्याव्यात याबाबत राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी डी. डी. भोसले पा. यांनी विभागीय आयुक्त सौरवराव यांना शहरातील पाणी नियोजना बदलच्या दोषा बाबत सविस्तर माहिती निवेदनाद्वारे दिली होती.परंतु भामआसखेड मुख्य विभागातच वारी काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी तिथे आवश्यक ते कर्मचारी यंत्रणा तत्काळ सुसज्ज असण्याची गरज भासत आहे.
आळंदी जलकेंद्र विभागात एम. जी.पी. चे आधिकारी कर्मचारी सुसज्ज असले तरी भामा आसखेड मुख्य विभागातच समस्या उदभवली तर आळंदी जलकेंद्रावर एम.जी. पी.चे त्यावेळेस कुशल कर्मचारी असून सुद्धा आळंदी शहराला पाणीपुरवठा होऊ शकत नाही.ऐन वारीत पाण्याची समस्या उदभवू शकते.त्यामुळे भाविक व नागरिकांना पाण्याची टंचाई समस्ये ला सामोरे जावे लागू नये.यासाठी भामआसखेड येथील मुख्य विभागात वारी काळात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी भामाआसखेड मुख्यविभागा कडे ही लक्ष देणे गरजेचे आहे. अशी भावना आळंदीतील नागरिकांनी व्यक्त केली.
Discussion about this post