व्हीएसआरएस न्युज सीमा भिंतीची पडझड झाल्यामुळे लहान मुले आत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने संबंधित सीमाभिंतीची तात्काळ दुरूस्ती करावी, अशी मागणी भाजपा नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भोसरी येथील सद्गुरूनगर, चक्रपाणी वसाहतीलगतच्या सीमा भिंतीची पडझड झाली आहे. सीमा भिंतीच्या आतील तलावात लहान मुले, तरुण पोहण्यासाठी जातात. तलावातील पाण्याची पातळी जास्त असते. गाळ साचल्याने लहान मुलांचे पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रसंग घडतात. सोमवारी या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी एका मुलाचा पाण्यात बुडून झाला. केवळ सिमाभिंत व्यवस्थित नसल्याने असे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत.
सद्गुरूनगर व चक्रपाणी वसाहत येथे राहणारे बहुतांश कुटुंबांचे हातावरील पोट आहे. त्यामुळे नवरा-बायको कंपनीत व मोलमजुरीसाठी जातात. शाळा बंद असल्याने मुलांना घरीच सोडून जावे लागते. घरी आई-वडील नसल्याने लहान मुले सहजरीत्या तलावाकडे जात आहेत.याबाबत गांभीर्याने विचार करण्यात यावा. तातडीने तलावाच्या सीमाभिंतीची झालेली पडझड दुरुस्त करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे, असेही नगरसेवक लांडगे यांनी म्हटले आहे.
Discussion about this post