व्हीएसआरएस मराठी न्युज -राज ठाकरे यांनी काल ठाण्यात उत्तरसभा घेत महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिला आहे.
तीन मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवा, अन्यथा संपूर्ण देशभरात हनुमान चालीसा लावू, असे ते म्हणाले आहेत. यावर राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. नियमात बसेल ते करणे आणि कायदा अबाधित ठेवणे ही आमची जबाबदारी असल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले.
प्रतिक्रिया देताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील राज ठाकरे यांनी एक समान नागरी कायदा आणावा, तसेच लोकसंख्या वाढीवर कायदा आणावा ही देखील मागणी केली आहे. यावर बोलताना, समान नागरी कायद्याबाबत देशपातळीवर अनेक चर्चा सुरू आहेत. काँग्रेस पक्ष म्हणून आमचे काय धोरण आहे, हे आता सांगणे सयुक्तिक ठरणार नाही. तसेच, भारत हे जागतिक स्तरावर मोठी लोकसंख्या असलेले देश म्हणून पाहिले जाते. मात्र या लोकसंख्येवर काही करता येईल का, ते शक्य आहे का, हे पाहणे गरजेचे आहे. यावर सर्व पक्ष एकत्र येत सखोल चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे सतेज पाटील म्हणाले.
दरम्यान मला ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक बदलला, असा माझ्यावर आरोप केला. पण, मी ट्रॅक नाही बदलला. माझा ट्रॅक बरोबर असून ईडीची नोटीस आल्यावर मी ईडी कार्यालयात गेलो. मी कोणतेही पाप केले नाही. त्यामुळे, नोटीस कोणत्याही येवूद्या मी भीक नसल्याचे यावेळी राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Discussion about this post