व्हीएसआरएस न्युज कोरोनासारख्या महामारीच्या काळात आता पावासाळी आजारांनीही डोकं वर काढलं आहे.
पावसाळ्यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या विषाणुजन्य रोगांच्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. तसेच बुरशीजन्य, उघड्यावरील अन्न आणि पाण्यामुळे होणारे रोग आणि इतर त्वचेच्या संक्रमणात वाढ झाली आहे. या आजारांची लक्षणं काहीशी कोरोना सारखीच असल्यानं अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.
कोविड-19 आणि मलेरिया किंवा/ डेंग्यूचं एकाच वेळी होणारं संक्रमण रोखणं ही काळाची गरज आहे. कोविड -19च्या प्रोटोकॉलचं पालन करा आणि संसर्ग होण्याची शक्यता टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता ठेवा, असं तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे.
Discussion about this post