व्हीएसआरएस न्युज चिखली-सातत्याने खंडित होणारा आणि कमी दाबाचा वीजपुरवठा, वाढीव वीजबिले अशा अनेक तक्रारींमुळे जाधववाडी, चिखली, शिवतेजनगर, कुदळवाडी परिसरातील नागरिक व व्यावसायिक हैराण झाले आहेत.
त्यामुळे महावितरण प्रशासनाने कार्यवाही करुन वीज समस्या सोडवावी, अशी मागणी माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक राहुल जाधव यांनी केली आहे.याबाबत महावितरण प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, चिखली, कुदळवाडी परिसरात वर्षानुवर्षे वीज समस्या कायम असून महावितरणाकडून मात्र याबाबत कोणत्याही स्वरूपाची दखल घेतली जात नसल्याने नागरिक व व्यावसायिक हतबल झाल्याचे चित्र आहे.
योग्य ती उपायोजना करून वीजपुरवठा सुरळीत करावा. विजदाब वाढवण्यासाठी ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढवून आवश्यक ते तांत्रिक बदल करावे. नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन सोडविण्यात याव्यात. संबंधीत विभागाने परिसरातील व्यावसायिकांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात तसेच त्या सोडवण्यासाठी यंत्रणा राबवावी, अशीही माजी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे.
Discussion about this post