व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबाबसहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या मोटारसायकल रॅलीचा प्रारंभ झाला.
खासदार राहुल गांधी यांची यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर अशी आहे. देशातील विषमतेचे वातावरण, धर्म आणि जातीमधील तेढ विरोधात ही यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेची शहरात जनजागृती व्हावी या करिता एलईडी (LED) स्क्रीन असलेल्या गाड्यांचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या एलईडी (LED) स्क्रीन असलेल्या गाड्यांवर् यात्रेचे प्रक्षेपण दाखविण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.
भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसकडून मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
Discussion about this post