व्हीएसआरएस मराठी न्युज चिखली-घरकुल चा ताबा नागरिकांना लवकर मिळावा अशी मागणी स्वि सदस्य दिनेश यादव यांनी सौ सुषमा शिंदे सह उपायुक्त झोपडपट्टी पुनर्वसन विभाग यांच्याकडे लेखी पत्र द्वारे केले आहे
चिखली, चर्होली ,मोशी या भागात महानगरपालिका वतीने गोर गरीब लोकांसाठी घरकुल योजना राबविल्या आहेत,अनेक ठिकाणी घरकुल तयार आहेत पण किरकोळ कामे पूर्ण झाली नसल्याने अजुन ही गोरगरीब जनतेला ह्या घराचा ताबा मिळाला नाही.
काही नागरिकांनी कर्ज घेऊन घरांसाठी पैसे भरले आहेत त्या कर्जाचे हप्ते सुरू झाले आहेत तसेच भाड्याच्या घरात राहत असल्याने घराचे भाडे असा दुप्पट भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहेत या साठी महानगरपालिकेने लवकरात लवकर राहीलेली कामे पूर्ण करावीत व नागरीकांना लवकर घरे ताब्यात द्यावी अशी मागणी श्री दिनेश यादव यांनी झोपडपट्टी पुनर्वसन विभाग प्रमुख सुषमा शिंदे यांना लेखी पत्र देऊन केली
Discussion about this post