व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी दि.१९ – महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भारतातील पहिली मुलींची शाळा असलेल्या भिडे वाडा अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशाने या जागेचा ताबा मिळणार आहे त्यामुळे तेरा वर्षाच्या संघर्षाला यश मिळालेले आहे. आता राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे याबद्दल कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे कष्टकरी वर्गाने एकमेकांना पेढे भरवून याबद्दल आनंद व्यक्त केला.
कामगार नेते काशिनाथ नखाते, अर्चना कांबळे,माधुरी जलमुलवार, सुशीला साळवे, इंदुबाई वाघचौरे,चींगुबाई ढोबळे,शीतल करपे,
अनिता निकम,अनिता भिसे,सुनीता भोरे, चैताली भंगाळे,सोनल साळवे,मछिंद्र करपे, बाबा धोत्रे,रफिक गोलंदाज,तुकाराम माने,
महादेव गायकवाड,
संभाजी भोंगाडे,
हेमंत यादव,संभाजी बोमनगे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्मारकासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून या मागणीला जोर धरलेला होता १ जानेवारी १८४८ रोजी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू झाली . भिडे वाडा हे ठिकाण राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी विविध संस्था संघटना व राजकीय पक्षाकडून मागणी केली जात होती यामध्ये कष्टकरी संघर्ष महासंघाचाही नेहमी सहभाग होता. १ जानेवारी रोजी होणाऱ्या पदयात्रेत रॅलीत सहभागी होऊन विविध ठिकाणी आंदोलनाबाबत सहभाग नोंदवला होता . सावित्रीबाईंच्या कार्याला साजेल अशा प्रकारचे भव्यदिव्य स्मारक व्हावे त्यातून भारतातीलच नव्हे तर जगातील नागरिकांना फुले दाम्पत्याची प्रेरणा मिळावी तसेच राज्य शासनाने केवळ निधीच्या घोषणा न करता प्रत्यक्ष तातडीने काम सुरू करावे अशी मागणी कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.
Discussion about this post