व्हीएसआरएस मराठी न्युज -बांगलादेशने भारताला 257 धावांचे लक्ष्य दिले आहे. संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 256 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने २-२ बळी घेतले.
आकडेवारीबद्दल बोलायचं झाले तर, भारतीय संघ बांगलादेशपेक्षा खूप पुढं आहे. परंतु, चिंतेची बाब म्हणजे बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या 5 पैकी 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे.
- भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
- बांगलादेश : लिटन दास, तंजीद तमीम, मेहदी हसन मिराज, नजमुल हसन शान्तो (कर्णधार), मुश्फिकुर रहीम (यष्टिरक्षक), तौहिद हृदॉय, महमुदुल्लाह, मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्लाम, नसून अहमद, हसन महमूद
Discussion about this post