व्हीएसआरएस मराठी न्युज –छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले. प्रत्येक व्यक्तीच्या धर्माचा मान, सन्मान राखणे हा काँग्रेसचा धर्म आहे. हिंदू, मुस्लिम या देशात एकजुटीने राहत आहेत, असे प्रतिपादन आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले.
हिंदू धर्मातील चार पिठांचे शंकराचार्य हे संपूर्ण धर्माला मार्गदर्शनाचे काम करतात. राम मंदिराचे काम अपूर्ण असताना केवळ एका माणसाच्या हट्टासाठी प्रभू श्री रामांना अपूर्ण मंदिरात बसवण्यात येत आहे. धर्माचा अपमान करणारा हा निव्वळ राजकीय इव्हेंट असून याबाबत पूजनीय शंकराचार्यांनी भाष्य केले.
राजकीय स्वार्थासाठी स्वतः चार पक्ष बदलून सध्या भाजपमध्ये असलेल्या नारायण राणे यांनी शंकराचार्यांचे हिंदू धर्मात योगदान काय असा सवाल करून आपल्या अकलेचे तारे तोडले, संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान केला. याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
Discussion about this post