व्हीएसआरएस मराठी न्युज –राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवारी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदासह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान झाले.
राज्य निवडणूक आयोगाने 7,751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे रविवारी प्रत्यक्षात 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले.
प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
ठाणे -35, पालघर-62, रायगड-191, रत्नागिरी-163, सिंधुदुर्ग-291, नाशिक-188, धुळे-118, जळगाव- 122, अहमदनगर-195, नंदुरबार-117, पुणे-176, सोलापूर-169, सातारा-259, सांगली-416, कोल्हापूर- 429, औरंगाबाद-208, बीड-671, नांदेड-160, उस्मानाबाद-165, परभणी-119, जालना-254, लातूर-338, हिंगोली- 61, अमरावती-252, अकोला-265, यवतमाळ-93, बुलढाणा-261, वाशिम-280, नागपूर-234, वर्धा -111, चंद्रपूर-58, भंडारा-304, गोंदिया-345, गडचिरोली-25 अशा एकूण 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.
राज्यात अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा, ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, नाशिक या जिल्ह्यांतील एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका पार पडल्या आहेत.
Discussion about this post