व्हीएसआरएस मराठी न्युज –निवडणुकांमध्ये तरुणांनाचा आवाज घुमणार असल्याने आमदार रोहित पवार यांनी तरुणांच्या प्रश्नांना हात घालत तब्बल ८०० किलोमीटरची युवा संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.
कंत्राटी भरती, पेपरफुटी आदीसंह विविध प्रश्नांवर या यात्रेदरम्यान विचारमंथन करण्यात येणार आहे.
मंगळवारी (दि.१७) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी माजी महापौर व जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत -धर, शकुंतला भाट, जनाबाई जाधव, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, युवक शहराध्यक्ष इमरान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, प्रदेश पदाधिकारी रविकांत वर्पे, काशिनाथ नखाते, शहर प्रवक्ते माधव पाटील, ज्येष्ठ नेते शिरीष जाधव, देवेंद्र तायडे, जयंत शिंदे, राहुल आहेर, सागर तापकीर, प्रशांत सपकाळ, मयूर जाधव, राहुल पवार स्वप्नाली असोले आदी उपस्थित होते.
दरम्यान, आमदार रोहित पवार येत्या २४ ऑक्टोबरपासून युवा संघर्ष यात्रा काढणार आहे. ही यात्रा ८०० किलोमीटरची पदयात्रा असून तब्बल १३ जिल्ह्यातून प्रवास करणार आहे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातून युवा संघर्ष यात्रेला सुरवात होणार असून ४५ दिवसांचा प्रवास करून ७ डिसेंबर रोजी नागपूरला याची सांगता होईल. पुण्यातील महात्मा फुले वाडा येथून या यात्रेला सुरवात होणार आहे. त्यांनतर वढू तुळापूर येथे नतमस्तक होऊन, यात्रेचा शुभारंभ होईल. संतांच्या, महाराजांच्या भूमीतून यात्रा जाणार असून दररोज कमीत कमी १६ आणि जास्तीत जास्त २५ किमी असा पायी प्रवास असणार आहे. या पदयात्रेचा एक भाग म्हणून, आमदार रोहित पवार इतर असंख्य युवांसोबत पुणे ते नागपूर अशी पदयात्रा करतील आणि राज्यातील तरुण-तरुणींना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी जनतेशी संवाद साधतील. संपूर्ण पदयात्रेदरम्यान, युवांना त्यांची मतं आणि अपेक्षा व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर रोहित पवार म्हणाले की, ‘युवा संघर्ष यात्रा’ ही युवांच्या नेतृत्वाखालील एक चळवळ आहे, ज्याचा मूळ उद्देश महाराष्ट्रातील युवांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जनसमर्थन एकत्रित करणे आणि युवा वर्गाचा आवाज शासनापर्यंत पोहचवणे हा आहे. आज युवा म्हणून संवाद साधत आहे. ज्या दिवसापासून राजकारणात आलो, तेंव्हापासून युवांचे प्रश्न मांडणे अन त्यांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न करत आलो आहे. मतदारसंघाप्रमाणेच युवांच्या प्रश्नांना ही प्राधान्य मांडले आहे. कंत्राटी भरती, पेपरफुटी, शाळा दत्तक देण्याचा निर्णय आदी प्रश्नावर आवाज उठवला जाणार आहे. त्याचबरोबर आजच्या राजकारणाची परिस्थिती पाहता युवा नेत्यांनी राजकारणात आलो ही चूक झाली का? किंवा नव्या पिढीने राजकारणात यावं की नाही? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी शरद गटाचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून युवा संघर्ष यात्रेला येत्या २४ ऑक्टोबर रोजी सुरुवात होणार आहे पुण्यातून या यात्रेला सुरुवात होईल पुणे ते नागपूर असा हा ८०० किलोमीटरचा प्रवास असणार आहे एकूण ४५ दिवसांचा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, वाशिम, जातेगाव, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, पिंपळगाव, कुंभार, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप ७ डिसेंबर रोजी होणार आहे.
Discussion about this post