व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
पवना धरण ते निगडी जलशुद्धीकरण केंद्र असे एकूण 34.71 किलोमीटर अंतराची भूमिगत दोन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यापैकी शहर हद्दीतील केवळ 4.40 किलोमीटर अंतर भूमिगत जलवाहिनीचे काम झाले आहे.
उर्वरित जागा शहर हद्दीबाहेरील मावळ तालुक्यातील आहे. उर्से येथील 3.3 किलोमीटर अंतराची जागा ताब्यात येणे शिल्लक आहे. त्याचा भूसंपादन निवाडा झाला आहे. उर्वरित जागेचे भूसंपादन होऊन ती जागा जिल्हाधिकार्यांच्या ताब्यात आली आहे. दुसरीकडे, शेतकर्यांच्या मागणीनुसार शिवणे व गहुंजे येथे पवना नदीवर कोल्हापूर पद्धतीने बंधारा बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शेतकर्यांना नदीद्वारे बारा महिने पाणी मिळू शकेल, असा दावा अधिकार्यांनी केला आहे.
पवना धरण ते निगडीच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत भूमिगत जलवाहिनीचा 14 वर्षांपासून रखडलेला प्रकल्पावरील स्थगिती उठवावी. प्रकल्पाचे काम करणे व वाढीव खर्चाबाबत तोडगा काढावा, यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिकेने महाराष्ट्र राज्य शासनाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी उर्से येथील 3.33 कि.मी. भूसंपादन शिल्लक आहे. उर्वरीत 32 कि.मी. भूसंपादन झाले आहे. प्रकल्पाचा पूर्ण खर्च पालिकेला झेपणार नाही. त्यामुळे राज्य आणि केंद्र शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. नवीन ठेकेदार नेमायचा की त्याच ठेकेदाराला काम द्यायचे, याचा निर्णय स्थगिती उठल्यानंतर घेण्यात येईल.
श्रीकांत सवणे, सहशहर अभियंता, पाणी पुरवठा विभाग
Discussion about this post