व्हीएसआरएस मराठी न्युज –गुरुवारी रात्री विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा 2 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 3 गडी गमावून 208 धावा केल्या. संघाकडून जोश इंग्लिशने (110) सर्वाधिक धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 20 व्या षटकात 8 गडी गमावून विजय मिळवला. संघातर्फे कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 80 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून तनवीर संघा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आणि त्याने 2 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली आणि तिसऱ्या षटकातच संघाने सुरुवातीच्या दोन्ही फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या.
ऋतुराज गायकवाड खाते न उघडता तर यशस्वी जैस्वाल 21 धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार आणि इशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 60 चेंडूत 112 धावांची भागीदारी करून काहीशा आशा निर्माण केल्या. सूर्यकुमारसोबत रिंकू सिंगने 5व्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली.
Discussion about this post