व्हीएसआरएस मराठी न्युज –पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आशिया कपच्या सुपर-४ लढतीला सामोरे जाण्याआधी अंतिम संघात लोकेश राहुल की ईशान किशन यांच्यापैकी कुणाला संधी द्यावी, यावरून भारतीय संघ व्यवस्थापन द्विधा मन:स्थितीत आहे.
सुपर-४ मध्ये विजयाची गरज
पाकविरुद्ध संतुलित संघ खेळविण्याचे रोहितपुढे आव्हान असेल, कारण सुपर-४ मध्ये विजयाचीच गरज आहे. पाकने लाहोरमध्ये बांगलादेशचा सात गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे भारतीय संघ गुणतालिकेत माघारला. पाकच्या भेदक माऱ्याचे आव्हान परतविणे भारतीय फलंदाजांसाठी आव्हान असेल. खेळपट्टी कशीही असली तरी प्रतिस्पर्धी गोलंदाज भेदक मारा करण्यास सक्षम आहेत. हारिस रौफने तीन सामन्यांत नऊ गडी बाद केले. आफ्रिदीने सात बळी घेतले. त्यामुळे गोलंदाजीत भारताच्या तुलनेत पाक संघ बलाढ्य वाटतो.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.
पाकिस्तानचा अंतिम संघ : बाबर आझम(कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक,सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद,मोहम्मद रिझवान(यष्टिरक्षक), फहीम अश्रफ,नसीम शाह, शाहीनशाह आफ्रिदी आणि हारिस रौफ.
Discussion about this post