व्हीएसआरएस मराठी न्युज -भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला आहे. दुसऱ्या टी२० सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवत भारताने 3 सामन्यांच्या या टी२० मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकांमध्ये 5 बाद 183 धावा केल्या.
श्रीलंकेसाठी दानुष्का गुणातिलकाने 38, पाथुम निसांकाने 75 तर कर्णधार दासुन शनाकाने नाबाद 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, यजुर्वेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केला.
श्रीलंकन संघाने विजयासाठी दिलेल्या 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या संघाने हे आव्हान 17.1 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावत पूर्ण केले. भारतासाठी श्रेयस अय्यरने सर्वाधिक नाबाद 74 धावा केल्या तर संजू सॅमसनने 39 आणि रवींद्र जडेजाने 45 धावा करत त्याला चांगली साथ दिली. या विजयासह भारताने 3 सामन्यांची या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
Discussion about this post