व्हीएसआरएस मराठी न्युज -भारतआणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (27 सप्टेंबर) खेळला गेला. राजकोट येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने शानदार फलंदाजी करताना 7 बाद 352 धावा उभारल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांनी अर्धशतके साजरी केली. मात्र, ग्लेन मॅक्सवेल यानेघेतलेल्या चार बळींमुळे ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला 66 धावांनी पराभूत केले. यासह ही मालिका भारतीय संघाने 2-1 अशा प्रकारे आपल्या नावे केली.
सामन्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला मालिका विजयाचे ट्रॉफी घेण्यासाठी आमंत्रित केले गेले. मात्र, रोहित ने मोठ्या मनाने यासाठी केएल राहुल याला पुढे बोलवत त्याच्या हातात ट्रॉफी देण्यास सांगितले. त्याची ही कृती सर्वांना आवडली व त्याचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात राहुल याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. मोहाली व इंदौर येथे झालेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवलेला. त्यामुळे रोहितने मालिका विजयाचा मान देखील राहुललाच देण्याचा निर्णय घेतला.
या सामन्याचा विचार केल्यास, ऑस्ट्रेलिया संघाने सलामीवीर मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ यांच्या अर्धशतकांमुळे 352 अशी मोठी मजल मारली. त्याच्या बदल्यात भारतीय संघ केवळ 286 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियासाठी चार बळी घेणारा ग्लेन मॅक्सवेल सामनावीर ठरला. तर, शुबमन गिल याला मालिकावीर पुरस्कार दिला गेला.
Discussion about this post